मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
Read More
खरीप पीकविमा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविमा जानेवारीपासून मिळणार
Read More
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More

बच्चू कडू यांचा सरकारला थेट इशारा: ‘आम्ही दिलेल्या वेळेची वाट पाहतोय’

‘आम्ही दिलेल्या वेळेची वाट पाहतोय’ शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर या विषयावर नेमलेल्या समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत बच्चू कडू यांनी प्रशासकीय आणि तांत्रिक मुद्द्यांवर जोर दिला. राष्ट्रीयकृत बँकांपेक्षाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा (DCCB) प्रश्न गंभीर असून, सरकारच्या गोंधळलेल्या धोरणामुळे या बँका कोलमडून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जिल्हा बँका अडचणीत येऊ नयेत आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे हित जपले जावे, यासाठी सध्या कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा (चालू कर्जदार) समावेश कर्जमाफीत करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. विदर्भातील सातारा आणि यवतमाळसह अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते, त्यांनी हे सर्व मुद्दे परदेशी साहेबांसमोर मांडले.

ADS किंमत पहा ×

बच्चू कडू यांनी सरकारवर धोरणात्मक गोंधळ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. सरकारने कर्जमाफीसाठी २० हजार कोटींची तरतूद केली असली तरी, नेमकी कोणत्या वर्षाची कर्जमाफी करणार आणि कर्जमाफीची निश्चित तारीख काय, याबद्दल स्पष्टता देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर नेत्यांचे (उद्धव ठाकरे आणि शरद पवार) नाव घेऊन घोषणा केल्या असल्या तरी, १९९६ पासून कर्जाच्या बोजाखाली असलेल्या ९० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कसा होणार, हा कडू यांचा सवाल आहे.

Leave a Comment